चि.
उद्धवराव, राजूभाऊ, सदाभाऊ, शीघ्र कवी सम्राट रामदासजी एकमेकांकडे पहात
बसली आहेत. सदाभाऊ, राजाभाऊ, रामदासजी यांचे चेहरे भुकेने कासावीस झाले
आहेत. न्याहरीची वेळ कधीच संपली आहे, जेवणाचीही वेळ टळून गेलेली आहे. एवढे
होऊनही एखादे ताट, डिश येत नाहीये हे पाहून मंडळी अस्वस्थ आहेत. चि.
उद्धवरावांच्या चेहऱ्यावर ' थोडा है , थोडे की जरुरत है ' असे काही तरी भाव
दिसताहेत. भुकेने अस्वस्थ झालेले तिघे येरझाऱ्या मारताहेतं. मात्र चि.
उद्धवराव जागेवरच बसून आहेत. कदाचित आपण जागेवरून उठलो तर आपण बसलोय ती
जमीन सुद्धा संपादन केली जाइल अशी भीती त्यांना वाटते आहे. तसे झाले तर
आपले डे लाईफ सुद्धा कठीण होईल अशी भावना त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवते
आहे. एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहूनही या मंडळींना आता कंटाळा येऊ लागला
आहे. शेवटी राजाभाऊ हातकणंगलेकर उठतात आणि हातातले उसाचे कांडके गुडघ्यावर
काडदिशी मोडतात आणि ऊस खाण्यास सुरुवात करतात. क़ाय करणार ' हंगर अच्छे
अच्छे को बदल देता है '. पाच मिनिटातच ते ऊस संपवून टाकतात. उसाच्या
चुइट्या सर्वत्र पसरलेल्या आहेत. त्यांचा चेहऱ्यावरील अस्वस्थतेची जागा आता
संतापाने घेतलीय. आपण मागितलेली ' एफआरपी' न मिळाल्याने आधीच कावलेले
सदाभाऊ राजुभाऊंकडे बारिक लक्ष ठेवून आहेत. राजूभाऊ चिडलेले आहेत, त्यांना
आणखी डिवचण्याची हीच वेळ आहे हे लक्षात आल्याने सदाभाऊ उठतात. त्यांच्या
आडूनच आपल्याला एखादी डिश मिळणार आहे हे त्यांना ठाऊक आहे.
' भाऊ
किती दिवस रहायचं या घरात . आपल्याला काही स्वाभिमान आहे की नाही ?'
सदाभाऊ मोठमोठ्याने बोलू लागतात. चिडलेल्या सदाभाऊंकडे उद्धवराव मिशीतल्या
मिशीत हसत असावेत अशी शंका पाहणाऱ्याला आली असती. उद्धवरावांच्या मनातील
भावना सदाभाऊंच्या कदाचित लक्षात आल्या असाव्यात. ' स्टार्टर मिळाल्यानंतर मेन कोर्स लवकर आला नाही तर पोटाचे काय हाल होतात हे तुम्हाला कळणार नाही , सदाभाऊ ' हा संवाद फेकताना उद्धवराव मान हलवत राहतात.
आपल्या नावाखाली हेच लोणी खाणार '
No comments:
Post a Comment